Friday, 23 November 2012

नैतिकतेची ऐशीतैशी



. पत्रकारितेतील हिणकस दूर करण्याची इच्छा होणे त्यासाठी अनेकजण एकत्र येणे आणि त्यासाठी करायचा कृती कार्यक्रम आखणे आशादायक म्हणाव्या लागतील .पत्रकारांचा पत्रकारांच्या नितीमुल्ल्यांचा विचार केला तर अनेक गोष्टी समाविष्ट असतात .नैतिकता ही सांगुन शिकवली जात नाही तर ती अनुभावाने ती आत्मसात करावी लागते .माध्यमांच्या बाबतीत तर ही नैतिकता वेशीवर टांगलेली नैतिकतेचा  प्रश्न आला कि अनेकांना प्रश्न पडतो कि समाजात नैतिकता पाळणारे किती जण  आज समाजात वावरत आहेत आणि किती लोकांना नैतिकतेचा खरा अर्थ माहीत आहे याचा विचार व्हायला हवा कारण समाजात नैतिकतेचे अक्षरश धिंडवडे काढले जात आहेत मात्र   समाजाची जी धुरा सांभाळणारे समाजातील लोकचं समाजाच्या वाईटावर उठले आहेत  यात काडीमात्र शंका नाही . पत्रकारितेमध्ये पत्रकाराने काय करणे बरोबर आणि काय करणे चुक ते ठरविण्यास मदत करणारी तत्वप्रणाली म्हणजे पत्रकारांच्या नीतीमूल्यांची संहिता आसे प्रा जॉन मेरिल यांचे म्हणणे आहे .पत्रकारांना नितीमुल्ये कोणी शिकवायची समाजातील छोटया चुकीची बातमी देणारेच चुकले तर त्यांच्या बातम्या कोणी छापायच्या आणि त्यांचावर वचक कोणी ठेवायचा असा प्रश्न आत्मपरीक्षण करण्याची सवय असलेल्या आणि त्यामुळे अस्वथ होणाऱ्या विविध कालखंडातील बऱ्याच पत्रकारांना पडत आला आहे असते .आज समाज जसा बदलत चालला आहे तसा समाजात वाईट प्रवृत्ती ही मोठ्या प्रमाणावर आहेत आज रुपर्ट मरडॉक सारखा माध्यमाचा जगजेत्ता केवळ साम्राज्य वाढीसाठी अनेक समाजविघातक कामे करताना दिसतो .म्हणजे फोन रेकॉर्ड करणे एखादी माहिती मिळवण्यासाठी पैसे देऊ करणे हे नैतिकतेच्या विरुद्ध आहे . .आज लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून माध्यमांना ओळखले जाते मात्र हाच आधार स्तंभ आता ढासळत चालला आहे .टीआरपी वाढवण्याच्या नावाखाली अशा थिल्लर गोष्टींना नको एवढे महत्त्व माध्यमांमधून दिले जाते. पण टीआरपीचे गणित पाहिले तर ते खोदा पहाड निकला चूहाअसे म्हणावे लागेल.मात्र माध्यमाचा असा उतावीळ पणा आज नैतिकतेचे बुरुज ढासळत आहे .आज माध्यमांच्या विश्वासहर्यातेवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे .त्यासाठी माध्यमांनी विचारपूर्वक वागणे क्रमप्राप्त जाले झाले आहे   माध्यमांच्या या अश्या बेताल वागण्याने समाज ही भरकटत चालला आहे माध्यमे ही समाज मनाचा आरसा आहेत आणि त्या मधुन व्यक्त होणारे संदेश हे समाजास घातक तर नाहीत ना हे माध्यमांनी पाहणे गरजेचे आहे मात्र आज तस न होता माध्यमे समाजात वाट्टेल ते दाखवतात मात्र समाजावर त्याचा वाईट परिणाम होताना दिसतो .पत्रकारितेतल्या पित्त्यांनी आपली नैतिकता पारच बासनात गुंडाळली आहेवाहिन्यांच्या जाहिरातींचे बजेट, तिथे काम करणाºयांचे प्रमोशन्स अशा अनेक गोष्टी अवलंबून असतात. मग टीआरपी वाढवण्यासाठी (?) वाट्टेल त्या थराला जात, सतत ब्रेकिंग न्यूजचा मारा करत त्यांचे काम चालते. आणि त्यामुळेच माध्यमे ही विश्वासाच्या लायकीची नाहीत मात्र एखाद्या वैक्तीने नैतिकता पाळली नाही आणि म्हणुन आम्ही तरी का पाळावी असा सूर माध्यमामध्ये डर्टी पिक्चर या चित्रपटाच्या वेळी पाहायला मिळाला मात्र विविध माध्यमांच्या या युगात माध्यमे हि नैतिकता हीन झालेली आपल्याला दिसतात .म्हणजे इंटरनेट मध्ये इमेल हैक करणे वर्तमानपत्रात पैसे देऊन बातम्या मिळवणे दूरचित्रवाणी मध्ये खोटी आणि काहीही ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवणे  ही सगळी नैतिकतेच्या विरुद्ध  जाणारी  उदाहरणे आहेत . समाज हा नैतिकतेच्या अगदी विरुद्ध दिशेने चालला आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे आज माध्यमाचे राजरोस पणे वागणे मात्र यात लोकांचा ही तितकाच गुन्हा आहे.जर समाजातील वाईट प्रवृत्ती ला बाहेर काढून नैतिकतेला नैतिकतेला धरून जर वागलो वागलो तर समाजातील अनेक समस्या दूर होतील होतील आणि सर्वसामान्य लोक ही माध्यमांवर विश्वास ठेऊ लागतील मात्र यासाठी माध्यमांनी आणि जनतेने ही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे आणि समाजातील प्रथा रूढी यांना दूर सारून समाज प्रगतीशील बनवणे गरजेचं आहे

पीत पत्रकारितेचा पिवळेपणा .....







पेड न्यूज हा लोकशाहीच्या चौथ्या स्तभाला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे .आजच्या आजच्या या या पत्रकारितेमध्ये खरच विचार करण्याची वेळ आली आहे कारण मुळातच पत्रकार हा समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून काम करत असतो आणि या मुळे पत्रकारितेतील स्वायतत्ता वस्तुनिष्ठता सामाजिक बांधिलकी सत्याची कास पूर्वग्रह रहित वृत्ती ईत्यदि मुल्ये ही पत्रकारांनीच जपायची असतात आणि तीच आज जपण्यात कुठे तरी पत्रकार अयशस्वी झाले आहेत .पत्रकारिता करण्यासाठी माध्यम हवे असते आणि माध्यम म्हटले की त्या अनुषंगाने त्या त्या माध्यमांचे अर्थकारण आणि समाजकारण आले यातूनच पीत पत्रकारिता उदयास आली.आणि या मुळेच समाजात पत्रकारीतेवरचा विश्वास उडत चालला आहे  भारतामध्ये अगदी अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमामधील भ्रष्टाचाराची चर्चा २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पेड न्यूज च्या संदर्भात झाली .एखादी जाहिरात वाचक अथवा प्रेक्षकांना न सांगता बातमीच्या स्वरुपात मांडणे पत्रकारितेच्या नैतिकतेला धरून आहे का विशेषतः जाहिरात जर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या आणि त्या प्रक्रियेतून निवडून येणाऱ्यांसाठी असेल तर लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेचे धिंडवडे काढल्यासारखेच नाही का असे अनेक प्रश्न या वेळेस विचारले गेले .या वेळेस ही माध्यम संस्था चे मालक पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील हितसंबध चांगले कळले . रुपर्ट मर्डोक हा ऑस्ट्रेलियन वंशाचा अमेरिकी माध्यमसम्राट! छापील आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचा अब्जावधी डॉलरचा धंदा हा मर्डोक खाजगी कंपन्यांद्वारे जगभर चालवत असतो. इंग्लंडमध्ये तर टेबलॉयडया वृत्तपत्रीय प्रकारांत मर्यादा सोडून सनसनाटी पत्रकारिता चालवली जाते. तेथे लाखो प्रतींचा खप असलेल्या न्यूज ऑफ द वर्ल्डया मर्डोक यांच्या मालकीच्या टेबलॉयडने वृत्तपत्र व्यवसाय व सामाजिक बांधीलकीचे सारे विधिनिषेध धाब्यावर बसवून मागील काही वर्षे पत्रकारिता (म्हणजे पीत पत्रकारिता) चालवली होती हे उघड झाले. राजकारणी तसेच इतर महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींचे मोबाइल हॅक करून (म्हणजे त्यांची खाजगी संभाषणे चोरून) एकामागोमाग एक लफडी व खाजगी प्रकरणे या टेबलॉयडने उघड्यावर आणली. आणि त्या मुळेच पीत पत्रकारिता अधिक प्रकाश झोतात आली आणि सरकारने आणि संपूर्ण जगणे ही त्या बाबतीत पाऊले उचलायला सुरुवात झाली मात्र ती तेवढया पुरतीच कारण त्या बाबतीत कडक कायदे अजून ही आमलात आणले नाहीत त्या मुळेच की काय समाजात  अजुन पेड न्यूज चे पेड अजुन ही अस्तित्वात आहे. आपल्या देशातील पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता ही गांधी युगांतील पत्रकारिता ध्येयवादी होती. त्या वेळी स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारलेले राष्ट्रीय नेते - गांधी, टिळक, आगरकर वगैरे - पत्रकारिता क्षेत्रांत वावरले ते स्वातंत्र्यासाठी, समाजमन घडवण्यासाठी, तयार करण्यासाठी. त्यांना समाजापर्यंत जाण्याचे ते एक माध्यम होते.

शोध पत्रकारिता या गोंडस बुरख्याआड दडून प्रत्यक्षात पीत पत्रकारिता करू पाहणाऱ्यांचा एक मोठा वर्ग तयार होऊ लागला आहे. पेड न्यूज हा प्रसार माध्यमातील भ्रष्टाचाराचाच एक प्रकार आहे आणि हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकणे ही काळाची गरज बनली आहे .आणि यासाठी समाजाने ही यासाठी सजगता दाखवणे गरजेचे आहे. भारतात महिलांना भर बाजारात विकले जाते, ही गोष्ट अश्विन सरीन या पत्रकाराने स्वत:च कमला नावाच्या महिलेची 'खरेदी' करून सिद्ध केली. अशा धैर्यशील पत्रकारांमुळे समाजव्यवस्था सुधारण्यास आणि सार्वजनिक जीवनाचे शुद्धीकरण होण्यास मदत झाली. पण केवळ सनसनाटी बातमीच्या हव्यासापोटी कुणी दुसऱ्याच्या खाजगी जीवनात शिरून नाहक बदनामी करण्याचे सत्र आरंभले, तर 'पत्रकार' म्हणून त्यांस संरक्षण मिळता कामा नये. समाजात पीत पत्रकारितेचे वादळ आज हि आहे आणि त्या माध्यमाचा समाजावर वाईट परिणाम होताना दिसत आहे मात्र याचा नाश होणे गरजेचे आहे . समाज हा होत असलेली पत्रकारिता ही पाहणे हेच समाजाचे काम आहे मात्र त्यातील जे काही गैरव्यवहार ते थांबवण्यास समाज हा नक्कीच मदत करू शकतो .मात्र यासाठी सर्व समाजाचे सहकार्य गरजेचे आहे .
पेड न्यूज हा लोकशाहीच्या चौथ्या स्तभाला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे .आजच्या आजच्या या या पत्रकारितेमध्ये खरच विचार करण्याची वेळ आली आहे कारण मुळातच पत्रकार हा समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून काम करत असतो आणि या मुळे पत्रकारितेतील स्वायतत्ता वस्तुनिष्ठता सामाजिक बांधिलकी सत्याची कास पूर्वग्रह रहित वृत्ती ईत्यदि मुल्ये ही पत्रकारांनीच जपायची असतात आणि तीच आज जपण्यात कुठे तरी पत्रकार अयशस्वी झाले आहेत .पत्रकारिता करण्यासाठी माध्यम हवे असते आणि माध्यम म्हटले की त्या अनुषंगाने त्या त्या माध्यमांचे अर्थकारण आणि समाजकारण आले यातूनच पीत पत्रकारिता उदयास आली.आणि या मुळेच समाजात पत्रकारीतेवरचा विश्वास उडत चालला आहे  भारतामध्ये अगदी अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमामधील भ्रष्टाचाराची चर्चा २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पेड न्यूज च्या संदर्भात झाली .एखादी जाहिरात वाचक अथवा प्रेक्षकांना न सांगता बातमीच्या स्वरुपात मांडणे पत्रकारितेच्या नैतिकतेला धरून आहे का विशेषतः जाहिरात जर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या आणि त्या प्रक्रियेतून निवडून येणाऱ्यांसाठी असेल तर लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेचे धिंडवडे काढल्यासारखेच नाही का असे अनेक प्रश्न या वेळेस विचारले गेले .या वेळेस ही माध्यम संस्था चे मालक पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील हितसंबध चांगले कळले . रुपर्ट मर्डोक हा ऑस्ट्रेलियन वंशाचा अमेरिकी माध्यमसम्राट! छापील आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचा अब्जावधी डॉलरचा धंदा हा मर्डोक खाजगी कंपन्यांद्वारे जगभर चालवत असतो. इंग्लंडमध्ये तर टेबलॉयडया वृत्तपत्रीय प्रकारांत मर्यादा सोडून सनसनाटी पत्रकारिता चालवली जाते. तेथे लाखो प्रतींचा खप असलेल्या न्यूज ऑफ द वर्ल्डया मर्डोक यांच्या मालकीच्या टेबलॉयडने वृत्तपत्र व्यवसाय व सामाजिक बांधीलकीचे सारे विधिनिषेध धाब्यावर बसवून मागील काही वर्षे पत्रकारिता (म्हणजे पीत पत्रकारिता) चालवली होती हे उघड झाले. राजकारणी तसेच इतर महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींचे मोबाइल हॅक करून (म्हणजे त्यांची खाजगी संभाषणे चोरून) एकामागोमाग एक लफडी व खाजगी प्रकरणे या टेबलॉयडने उघड्यावर आणली. आणि त्या मुळेच पीत पत्रकारिता अधिक प्रकाश झोतात आली आणि सरकारने आणि संपूर्ण जगणे ही त्या बाबतीत पाऊले उचलायला सुरुवात झाली मात्र ती तेवढया पुरतीच कारण त्या बाबतीत कडक कायदे अजून ही आमलात आणले नाहीत त्या मुळेच की काय समाजात  अजुन पेड न्यूज चे पेड अजुन ही अस्तित्वात आहे. आपल्या देशातील पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता ही गांधी युगांतील पत्रकारिता ध्येयवादी होती. त्या वेळी स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारलेले राष्ट्रीय नेते - गांधी, टिळक, आगरकर वगैरे - पत्रकारिता क्षेत्रांत वावरले ते स्वातंत्र्यासाठी, समाजमन घडवण्यासाठी, तयार करण्यासाठी. त्यांना समाजापर्यंत जाण्याचे ते एक माध्यम होते.

शोध पत्रकारिता या गोंडस बुरख्याआड दडून प्रत्यक्षात पीत पत्रकारिता करू पाहणाऱ्यांचा एक मोठा वर्ग तयार होऊ लागला आहे. पेड न्यूज हा प्रसार माध्यमातील भ्रष्टाचाराचाच एक प्रकार आहे आणि हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकणे ही काळाची गरज बनली आहे .आणि यासाठी समाजाने ही यासाठी सजगता दाखवणे गरजेचे आहे. भारतात महिलांना भर बाजारात विकले जाते, ही गोष्ट अश्विन सरीन या पत्रकाराने स्वत:च कमला नावाच्या महिलेची 'खरेदी' करून सिद्ध केली. अशा धैर्यशील पत्रकारांमुळे समाजव्यवस्था सुधारण्यास आणि सार्वजनिक जीवनाचे शुद्धीकरण होण्यास मदत झाली. पण केवळ सनसनाटी बातमीच्या हव्यासापोटी कुणी दुसऱ्याच्या खाजगी जीवनात शिरून नाहक बदनामी करण्याचे सत्र आरंभले, तर 'पत्रकार' म्हणून त्यांस संरक्षण मिळता कामा नये. समाजात पीत पत्रकारितेचे वादळ आज हि आहे आणि त्या माध्यमाचा समाजावर वाईट परिणाम होताना दिसत आहे मात्र याचा नाश होणे गरजेचे आहे . समाज हा होत असलेली पत्रकारिता ही पाहणे हेच समाजाचे काम आहे मात्र त्यातील जे काही गैरव्यवहार ते थांबवण्यास समाज हा नक्कीच मदत करू शकतो .मात्र यासाठी सर्व समाजाचे सहकार्य गरजेचे आहे .