Friday, 23 November 2012

पीत पत्रकारितेचा पिवळेपणा .....







पेड न्यूज हा लोकशाहीच्या चौथ्या स्तभाला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे .आजच्या आजच्या या या पत्रकारितेमध्ये खरच विचार करण्याची वेळ आली आहे कारण मुळातच पत्रकार हा समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून काम करत असतो आणि या मुळे पत्रकारितेतील स्वायतत्ता वस्तुनिष्ठता सामाजिक बांधिलकी सत्याची कास पूर्वग्रह रहित वृत्ती ईत्यदि मुल्ये ही पत्रकारांनीच जपायची असतात आणि तीच आज जपण्यात कुठे तरी पत्रकार अयशस्वी झाले आहेत .पत्रकारिता करण्यासाठी माध्यम हवे असते आणि माध्यम म्हटले की त्या अनुषंगाने त्या त्या माध्यमांचे अर्थकारण आणि समाजकारण आले यातूनच पीत पत्रकारिता उदयास आली.आणि या मुळेच समाजात पत्रकारीतेवरचा विश्वास उडत चालला आहे  भारतामध्ये अगदी अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमामधील भ्रष्टाचाराची चर्चा २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पेड न्यूज च्या संदर्भात झाली .एखादी जाहिरात वाचक अथवा प्रेक्षकांना न सांगता बातमीच्या स्वरुपात मांडणे पत्रकारितेच्या नैतिकतेला धरून आहे का विशेषतः जाहिरात जर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या आणि त्या प्रक्रियेतून निवडून येणाऱ्यांसाठी असेल तर लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेचे धिंडवडे काढल्यासारखेच नाही का असे अनेक प्रश्न या वेळेस विचारले गेले .या वेळेस ही माध्यम संस्था चे मालक पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील हितसंबध चांगले कळले . रुपर्ट मर्डोक हा ऑस्ट्रेलियन वंशाचा अमेरिकी माध्यमसम्राट! छापील आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचा अब्जावधी डॉलरचा धंदा हा मर्डोक खाजगी कंपन्यांद्वारे जगभर चालवत असतो. इंग्लंडमध्ये तर टेबलॉयडया वृत्तपत्रीय प्रकारांत मर्यादा सोडून सनसनाटी पत्रकारिता चालवली जाते. तेथे लाखो प्रतींचा खप असलेल्या न्यूज ऑफ द वर्ल्डया मर्डोक यांच्या मालकीच्या टेबलॉयडने वृत्तपत्र व्यवसाय व सामाजिक बांधीलकीचे सारे विधिनिषेध धाब्यावर बसवून मागील काही वर्षे पत्रकारिता (म्हणजे पीत पत्रकारिता) चालवली होती हे उघड झाले. राजकारणी तसेच इतर महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींचे मोबाइल हॅक करून (म्हणजे त्यांची खाजगी संभाषणे चोरून) एकामागोमाग एक लफडी व खाजगी प्रकरणे या टेबलॉयडने उघड्यावर आणली. आणि त्या मुळेच पीत पत्रकारिता अधिक प्रकाश झोतात आली आणि सरकारने आणि संपूर्ण जगणे ही त्या बाबतीत पाऊले उचलायला सुरुवात झाली मात्र ती तेवढया पुरतीच कारण त्या बाबतीत कडक कायदे अजून ही आमलात आणले नाहीत त्या मुळेच की काय समाजात  अजुन पेड न्यूज चे पेड अजुन ही अस्तित्वात आहे. आपल्या देशातील पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता ही गांधी युगांतील पत्रकारिता ध्येयवादी होती. त्या वेळी स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारलेले राष्ट्रीय नेते - गांधी, टिळक, आगरकर वगैरे - पत्रकारिता क्षेत्रांत वावरले ते स्वातंत्र्यासाठी, समाजमन घडवण्यासाठी, तयार करण्यासाठी. त्यांना समाजापर्यंत जाण्याचे ते एक माध्यम होते.

शोध पत्रकारिता या गोंडस बुरख्याआड दडून प्रत्यक्षात पीत पत्रकारिता करू पाहणाऱ्यांचा एक मोठा वर्ग तयार होऊ लागला आहे. पेड न्यूज हा प्रसार माध्यमातील भ्रष्टाचाराचाच एक प्रकार आहे आणि हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकणे ही काळाची गरज बनली आहे .आणि यासाठी समाजाने ही यासाठी सजगता दाखवणे गरजेचे आहे. भारतात महिलांना भर बाजारात विकले जाते, ही गोष्ट अश्विन सरीन या पत्रकाराने स्वत:च कमला नावाच्या महिलेची 'खरेदी' करून सिद्ध केली. अशा धैर्यशील पत्रकारांमुळे समाजव्यवस्था सुधारण्यास आणि सार्वजनिक जीवनाचे शुद्धीकरण होण्यास मदत झाली. पण केवळ सनसनाटी बातमीच्या हव्यासापोटी कुणी दुसऱ्याच्या खाजगी जीवनात शिरून नाहक बदनामी करण्याचे सत्र आरंभले, तर 'पत्रकार' म्हणून त्यांस संरक्षण मिळता कामा नये. समाजात पीत पत्रकारितेचे वादळ आज हि आहे आणि त्या माध्यमाचा समाजावर वाईट परिणाम होताना दिसत आहे मात्र याचा नाश होणे गरजेचे आहे . समाज हा होत असलेली पत्रकारिता ही पाहणे हेच समाजाचे काम आहे मात्र त्यातील जे काही गैरव्यवहार ते थांबवण्यास समाज हा नक्कीच मदत करू शकतो .मात्र यासाठी सर्व समाजाचे सहकार्य गरजेचे आहे .
पेड न्यूज हा लोकशाहीच्या चौथ्या स्तभाला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे .आजच्या आजच्या या या पत्रकारितेमध्ये खरच विचार करण्याची वेळ आली आहे कारण मुळातच पत्रकार हा समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून काम करत असतो आणि या मुळे पत्रकारितेतील स्वायतत्ता वस्तुनिष्ठता सामाजिक बांधिलकी सत्याची कास पूर्वग्रह रहित वृत्ती ईत्यदि मुल्ये ही पत्रकारांनीच जपायची असतात आणि तीच आज जपण्यात कुठे तरी पत्रकार अयशस्वी झाले आहेत .पत्रकारिता करण्यासाठी माध्यम हवे असते आणि माध्यम म्हटले की त्या अनुषंगाने त्या त्या माध्यमांचे अर्थकारण आणि समाजकारण आले यातूनच पीत पत्रकारिता उदयास आली.आणि या मुळेच समाजात पत्रकारीतेवरचा विश्वास उडत चालला आहे  भारतामध्ये अगदी अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमामधील भ्रष्टाचाराची चर्चा २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पेड न्यूज च्या संदर्भात झाली .एखादी जाहिरात वाचक अथवा प्रेक्षकांना न सांगता बातमीच्या स्वरुपात मांडणे पत्रकारितेच्या नैतिकतेला धरून आहे का विशेषतः जाहिरात जर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या आणि त्या प्रक्रियेतून निवडून येणाऱ्यांसाठी असेल तर लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेचे धिंडवडे काढल्यासारखेच नाही का असे अनेक प्रश्न या वेळेस विचारले गेले .या वेळेस ही माध्यम संस्था चे मालक पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील हितसंबध चांगले कळले . रुपर्ट मर्डोक हा ऑस्ट्रेलियन वंशाचा अमेरिकी माध्यमसम्राट! छापील आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचा अब्जावधी डॉलरचा धंदा हा मर्डोक खाजगी कंपन्यांद्वारे जगभर चालवत असतो. इंग्लंडमध्ये तर टेबलॉयडया वृत्तपत्रीय प्रकारांत मर्यादा सोडून सनसनाटी पत्रकारिता चालवली जाते. तेथे लाखो प्रतींचा खप असलेल्या न्यूज ऑफ द वर्ल्डया मर्डोक यांच्या मालकीच्या टेबलॉयडने वृत्तपत्र व्यवसाय व सामाजिक बांधीलकीचे सारे विधिनिषेध धाब्यावर बसवून मागील काही वर्षे पत्रकारिता (म्हणजे पीत पत्रकारिता) चालवली होती हे उघड झाले. राजकारणी तसेच इतर महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींचे मोबाइल हॅक करून (म्हणजे त्यांची खाजगी संभाषणे चोरून) एकामागोमाग एक लफडी व खाजगी प्रकरणे या टेबलॉयडने उघड्यावर आणली. आणि त्या मुळेच पीत पत्रकारिता अधिक प्रकाश झोतात आली आणि सरकारने आणि संपूर्ण जगणे ही त्या बाबतीत पाऊले उचलायला सुरुवात झाली मात्र ती तेवढया पुरतीच कारण त्या बाबतीत कडक कायदे अजून ही आमलात आणले नाहीत त्या मुळेच की काय समाजात  अजुन पेड न्यूज चे पेड अजुन ही अस्तित्वात आहे. आपल्या देशातील पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता ही गांधी युगांतील पत्रकारिता ध्येयवादी होती. त्या वेळी स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारलेले राष्ट्रीय नेते - गांधी, टिळक, आगरकर वगैरे - पत्रकारिता क्षेत्रांत वावरले ते स्वातंत्र्यासाठी, समाजमन घडवण्यासाठी, तयार करण्यासाठी. त्यांना समाजापर्यंत जाण्याचे ते एक माध्यम होते.

शोध पत्रकारिता या गोंडस बुरख्याआड दडून प्रत्यक्षात पीत पत्रकारिता करू पाहणाऱ्यांचा एक मोठा वर्ग तयार होऊ लागला आहे. पेड न्यूज हा प्रसार माध्यमातील भ्रष्टाचाराचाच एक प्रकार आहे आणि हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकणे ही काळाची गरज बनली आहे .आणि यासाठी समाजाने ही यासाठी सजगता दाखवणे गरजेचे आहे. भारतात महिलांना भर बाजारात विकले जाते, ही गोष्ट अश्विन सरीन या पत्रकाराने स्वत:च कमला नावाच्या महिलेची 'खरेदी' करून सिद्ध केली. अशा धैर्यशील पत्रकारांमुळे समाजव्यवस्था सुधारण्यास आणि सार्वजनिक जीवनाचे शुद्धीकरण होण्यास मदत झाली. पण केवळ सनसनाटी बातमीच्या हव्यासापोटी कुणी दुसऱ्याच्या खाजगी जीवनात शिरून नाहक बदनामी करण्याचे सत्र आरंभले, तर 'पत्रकार' म्हणून त्यांस संरक्षण मिळता कामा नये. समाजात पीत पत्रकारितेचे वादळ आज हि आहे आणि त्या माध्यमाचा समाजावर वाईट परिणाम होताना दिसत आहे मात्र याचा नाश होणे गरजेचे आहे . समाज हा होत असलेली पत्रकारिता ही पाहणे हेच समाजाचे काम आहे मात्र त्यातील जे काही गैरव्यवहार ते थांबवण्यास समाज हा नक्कीच मदत करू शकतो .मात्र यासाठी सर्व समाजाचे सहकार्य गरजेचे आहे .

No comments:

Post a Comment