Friday, 23 November 2012

नैतिकतेची ऐशीतैशी



. पत्रकारितेतील हिणकस दूर करण्याची इच्छा होणे त्यासाठी अनेकजण एकत्र येणे आणि त्यासाठी करायचा कृती कार्यक्रम आखणे आशादायक म्हणाव्या लागतील .पत्रकारांचा पत्रकारांच्या नितीमुल्ल्यांचा विचार केला तर अनेक गोष्टी समाविष्ट असतात .नैतिकता ही सांगुन शिकवली जात नाही तर ती अनुभावाने ती आत्मसात करावी लागते .माध्यमांच्या बाबतीत तर ही नैतिकता वेशीवर टांगलेली नैतिकतेचा  प्रश्न आला कि अनेकांना प्रश्न पडतो कि समाजात नैतिकता पाळणारे किती जण  आज समाजात वावरत आहेत आणि किती लोकांना नैतिकतेचा खरा अर्थ माहीत आहे याचा विचार व्हायला हवा कारण समाजात नैतिकतेचे अक्षरश धिंडवडे काढले जात आहेत मात्र   समाजाची जी धुरा सांभाळणारे समाजातील लोकचं समाजाच्या वाईटावर उठले आहेत  यात काडीमात्र शंका नाही . पत्रकारितेमध्ये पत्रकाराने काय करणे बरोबर आणि काय करणे चुक ते ठरविण्यास मदत करणारी तत्वप्रणाली म्हणजे पत्रकारांच्या नीतीमूल्यांची संहिता आसे प्रा जॉन मेरिल यांचे म्हणणे आहे .पत्रकारांना नितीमुल्ये कोणी शिकवायची समाजातील छोटया चुकीची बातमी देणारेच चुकले तर त्यांच्या बातम्या कोणी छापायच्या आणि त्यांचावर वचक कोणी ठेवायचा असा प्रश्न आत्मपरीक्षण करण्याची सवय असलेल्या आणि त्यामुळे अस्वथ होणाऱ्या विविध कालखंडातील बऱ्याच पत्रकारांना पडत आला आहे असते .आज समाज जसा बदलत चालला आहे तसा समाजात वाईट प्रवृत्ती ही मोठ्या प्रमाणावर आहेत आज रुपर्ट मरडॉक सारखा माध्यमाचा जगजेत्ता केवळ साम्राज्य वाढीसाठी अनेक समाजविघातक कामे करताना दिसतो .म्हणजे फोन रेकॉर्ड करणे एखादी माहिती मिळवण्यासाठी पैसे देऊ करणे हे नैतिकतेच्या विरुद्ध आहे . .आज लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून माध्यमांना ओळखले जाते मात्र हाच आधार स्तंभ आता ढासळत चालला आहे .टीआरपी वाढवण्याच्या नावाखाली अशा थिल्लर गोष्टींना नको एवढे महत्त्व माध्यमांमधून दिले जाते. पण टीआरपीचे गणित पाहिले तर ते खोदा पहाड निकला चूहाअसे म्हणावे लागेल.मात्र माध्यमाचा असा उतावीळ पणा आज नैतिकतेचे बुरुज ढासळत आहे .आज माध्यमांच्या विश्वासहर्यातेवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे .त्यासाठी माध्यमांनी विचारपूर्वक वागणे क्रमप्राप्त जाले झाले आहे   माध्यमांच्या या अश्या बेताल वागण्याने समाज ही भरकटत चालला आहे माध्यमे ही समाज मनाचा आरसा आहेत आणि त्या मधुन व्यक्त होणारे संदेश हे समाजास घातक तर नाहीत ना हे माध्यमांनी पाहणे गरजेचे आहे मात्र आज तस न होता माध्यमे समाजात वाट्टेल ते दाखवतात मात्र समाजावर त्याचा वाईट परिणाम होताना दिसतो .पत्रकारितेतल्या पित्त्यांनी आपली नैतिकता पारच बासनात गुंडाळली आहेवाहिन्यांच्या जाहिरातींचे बजेट, तिथे काम करणाºयांचे प्रमोशन्स अशा अनेक गोष्टी अवलंबून असतात. मग टीआरपी वाढवण्यासाठी (?) वाट्टेल त्या थराला जात, सतत ब्रेकिंग न्यूजचा मारा करत त्यांचे काम चालते. आणि त्यामुळेच माध्यमे ही विश्वासाच्या लायकीची नाहीत मात्र एखाद्या वैक्तीने नैतिकता पाळली नाही आणि म्हणुन आम्ही तरी का पाळावी असा सूर माध्यमामध्ये डर्टी पिक्चर या चित्रपटाच्या वेळी पाहायला मिळाला मात्र विविध माध्यमांच्या या युगात माध्यमे हि नैतिकता हीन झालेली आपल्याला दिसतात .म्हणजे इंटरनेट मध्ये इमेल हैक करणे वर्तमानपत्रात पैसे देऊन बातम्या मिळवणे दूरचित्रवाणी मध्ये खोटी आणि काहीही ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवणे  ही सगळी नैतिकतेच्या विरुद्ध  जाणारी  उदाहरणे आहेत . समाज हा नैतिकतेच्या अगदी विरुद्ध दिशेने चालला आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे आज माध्यमाचे राजरोस पणे वागणे मात्र यात लोकांचा ही तितकाच गुन्हा आहे.जर समाजातील वाईट प्रवृत्ती ला बाहेर काढून नैतिकतेला नैतिकतेला धरून जर वागलो वागलो तर समाजातील अनेक समस्या दूर होतील होतील आणि सर्वसामान्य लोक ही माध्यमांवर विश्वास ठेऊ लागतील मात्र यासाठी माध्यमांनी आणि जनतेने ही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे आणि समाजातील प्रथा रूढी यांना दूर सारून समाज प्रगतीशील बनवणे गरजेचं आहे

पीत पत्रकारितेचा पिवळेपणा .....







पेड न्यूज हा लोकशाहीच्या चौथ्या स्तभाला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे .आजच्या आजच्या या या पत्रकारितेमध्ये खरच विचार करण्याची वेळ आली आहे कारण मुळातच पत्रकार हा समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून काम करत असतो आणि या मुळे पत्रकारितेतील स्वायतत्ता वस्तुनिष्ठता सामाजिक बांधिलकी सत्याची कास पूर्वग्रह रहित वृत्ती ईत्यदि मुल्ये ही पत्रकारांनीच जपायची असतात आणि तीच आज जपण्यात कुठे तरी पत्रकार अयशस्वी झाले आहेत .पत्रकारिता करण्यासाठी माध्यम हवे असते आणि माध्यम म्हटले की त्या अनुषंगाने त्या त्या माध्यमांचे अर्थकारण आणि समाजकारण आले यातूनच पीत पत्रकारिता उदयास आली.आणि या मुळेच समाजात पत्रकारीतेवरचा विश्वास उडत चालला आहे  भारतामध्ये अगदी अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमामधील भ्रष्टाचाराची चर्चा २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पेड न्यूज च्या संदर्भात झाली .एखादी जाहिरात वाचक अथवा प्रेक्षकांना न सांगता बातमीच्या स्वरुपात मांडणे पत्रकारितेच्या नैतिकतेला धरून आहे का विशेषतः जाहिरात जर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या आणि त्या प्रक्रियेतून निवडून येणाऱ्यांसाठी असेल तर लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेचे धिंडवडे काढल्यासारखेच नाही का असे अनेक प्रश्न या वेळेस विचारले गेले .या वेळेस ही माध्यम संस्था चे मालक पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील हितसंबध चांगले कळले . रुपर्ट मर्डोक हा ऑस्ट्रेलियन वंशाचा अमेरिकी माध्यमसम्राट! छापील आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचा अब्जावधी डॉलरचा धंदा हा मर्डोक खाजगी कंपन्यांद्वारे जगभर चालवत असतो. इंग्लंडमध्ये तर टेबलॉयडया वृत्तपत्रीय प्रकारांत मर्यादा सोडून सनसनाटी पत्रकारिता चालवली जाते. तेथे लाखो प्रतींचा खप असलेल्या न्यूज ऑफ द वर्ल्डया मर्डोक यांच्या मालकीच्या टेबलॉयडने वृत्तपत्र व्यवसाय व सामाजिक बांधीलकीचे सारे विधिनिषेध धाब्यावर बसवून मागील काही वर्षे पत्रकारिता (म्हणजे पीत पत्रकारिता) चालवली होती हे उघड झाले. राजकारणी तसेच इतर महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींचे मोबाइल हॅक करून (म्हणजे त्यांची खाजगी संभाषणे चोरून) एकामागोमाग एक लफडी व खाजगी प्रकरणे या टेबलॉयडने उघड्यावर आणली. आणि त्या मुळेच पीत पत्रकारिता अधिक प्रकाश झोतात आली आणि सरकारने आणि संपूर्ण जगणे ही त्या बाबतीत पाऊले उचलायला सुरुवात झाली मात्र ती तेवढया पुरतीच कारण त्या बाबतीत कडक कायदे अजून ही आमलात आणले नाहीत त्या मुळेच की काय समाजात  अजुन पेड न्यूज चे पेड अजुन ही अस्तित्वात आहे. आपल्या देशातील पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता ही गांधी युगांतील पत्रकारिता ध्येयवादी होती. त्या वेळी स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारलेले राष्ट्रीय नेते - गांधी, टिळक, आगरकर वगैरे - पत्रकारिता क्षेत्रांत वावरले ते स्वातंत्र्यासाठी, समाजमन घडवण्यासाठी, तयार करण्यासाठी. त्यांना समाजापर्यंत जाण्याचे ते एक माध्यम होते.

शोध पत्रकारिता या गोंडस बुरख्याआड दडून प्रत्यक्षात पीत पत्रकारिता करू पाहणाऱ्यांचा एक मोठा वर्ग तयार होऊ लागला आहे. पेड न्यूज हा प्रसार माध्यमातील भ्रष्टाचाराचाच एक प्रकार आहे आणि हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकणे ही काळाची गरज बनली आहे .आणि यासाठी समाजाने ही यासाठी सजगता दाखवणे गरजेचे आहे. भारतात महिलांना भर बाजारात विकले जाते, ही गोष्ट अश्विन सरीन या पत्रकाराने स्वत:च कमला नावाच्या महिलेची 'खरेदी' करून सिद्ध केली. अशा धैर्यशील पत्रकारांमुळे समाजव्यवस्था सुधारण्यास आणि सार्वजनिक जीवनाचे शुद्धीकरण होण्यास मदत झाली. पण केवळ सनसनाटी बातमीच्या हव्यासापोटी कुणी दुसऱ्याच्या खाजगी जीवनात शिरून नाहक बदनामी करण्याचे सत्र आरंभले, तर 'पत्रकार' म्हणून त्यांस संरक्षण मिळता कामा नये. समाजात पीत पत्रकारितेचे वादळ आज हि आहे आणि त्या माध्यमाचा समाजावर वाईट परिणाम होताना दिसत आहे मात्र याचा नाश होणे गरजेचे आहे . समाज हा होत असलेली पत्रकारिता ही पाहणे हेच समाजाचे काम आहे मात्र त्यातील जे काही गैरव्यवहार ते थांबवण्यास समाज हा नक्कीच मदत करू शकतो .मात्र यासाठी सर्व समाजाचे सहकार्य गरजेचे आहे .
पेड न्यूज हा लोकशाहीच्या चौथ्या स्तभाला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे .आजच्या आजच्या या या पत्रकारितेमध्ये खरच विचार करण्याची वेळ आली आहे कारण मुळातच पत्रकार हा समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून काम करत असतो आणि या मुळे पत्रकारितेतील स्वायतत्ता वस्तुनिष्ठता सामाजिक बांधिलकी सत्याची कास पूर्वग्रह रहित वृत्ती ईत्यदि मुल्ये ही पत्रकारांनीच जपायची असतात आणि तीच आज जपण्यात कुठे तरी पत्रकार अयशस्वी झाले आहेत .पत्रकारिता करण्यासाठी माध्यम हवे असते आणि माध्यम म्हटले की त्या अनुषंगाने त्या त्या माध्यमांचे अर्थकारण आणि समाजकारण आले यातूनच पीत पत्रकारिता उदयास आली.आणि या मुळेच समाजात पत्रकारीतेवरचा विश्वास उडत चालला आहे  भारतामध्ये अगदी अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमामधील भ्रष्टाचाराची चर्चा २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पेड न्यूज च्या संदर्भात झाली .एखादी जाहिरात वाचक अथवा प्रेक्षकांना न सांगता बातमीच्या स्वरुपात मांडणे पत्रकारितेच्या नैतिकतेला धरून आहे का विशेषतः जाहिरात जर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या आणि त्या प्रक्रियेतून निवडून येणाऱ्यांसाठी असेल तर लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेचे धिंडवडे काढल्यासारखेच नाही का असे अनेक प्रश्न या वेळेस विचारले गेले .या वेळेस ही माध्यम संस्था चे मालक पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील हितसंबध चांगले कळले . रुपर्ट मर्डोक हा ऑस्ट्रेलियन वंशाचा अमेरिकी माध्यमसम्राट! छापील आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचा अब्जावधी डॉलरचा धंदा हा मर्डोक खाजगी कंपन्यांद्वारे जगभर चालवत असतो. इंग्लंडमध्ये तर टेबलॉयडया वृत्तपत्रीय प्रकारांत मर्यादा सोडून सनसनाटी पत्रकारिता चालवली जाते. तेथे लाखो प्रतींचा खप असलेल्या न्यूज ऑफ द वर्ल्डया मर्डोक यांच्या मालकीच्या टेबलॉयडने वृत्तपत्र व्यवसाय व सामाजिक बांधीलकीचे सारे विधिनिषेध धाब्यावर बसवून मागील काही वर्षे पत्रकारिता (म्हणजे पीत पत्रकारिता) चालवली होती हे उघड झाले. राजकारणी तसेच इतर महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींचे मोबाइल हॅक करून (म्हणजे त्यांची खाजगी संभाषणे चोरून) एकामागोमाग एक लफडी व खाजगी प्रकरणे या टेबलॉयडने उघड्यावर आणली. आणि त्या मुळेच पीत पत्रकारिता अधिक प्रकाश झोतात आली आणि सरकारने आणि संपूर्ण जगणे ही त्या बाबतीत पाऊले उचलायला सुरुवात झाली मात्र ती तेवढया पुरतीच कारण त्या बाबतीत कडक कायदे अजून ही आमलात आणले नाहीत त्या मुळेच की काय समाजात  अजुन पेड न्यूज चे पेड अजुन ही अस्तित्वात आहे. आपल्या देशातील पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता ही गांधी युगांतील पत्रकारिता ध्येयवादी होती. त्या वेळी स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारलेले राष्ट्रीय नेते - गांधी, टिळक, आगरकर वगैरे - पत्रकारिता क्षेत्रांत वावरले ते स्वातंत्र्यासाठी, समाजमन घडवण्यासाठी, तयार करण्यासाठी. त्यांना समाजापर्यंत जाण्याचे ते एक माध्यम होते.

शोध पत्रकारिता या गोंडस बुरख्याआड दडून प्रत्यक्षात पीत पत्रकारिता करू पाहणाऱ्यांचा एक मोठा वर्ग तयार होऊ लागला आहे. पेड न्यूज हा प्रसार माध्यमातील भ्रष्टाचाराचाच एक प्रकार आहे आणि हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकणे ही काळाची गरज बनली आहे .आणि यासाठी समाजाने ही यासाठी सजगता दाखवणे गरजेचे आहे. भारतात महिलांना भर बाजारात विकले जाते, ही गोष्ट अश्विन सरीन या पत्रकाराने स्वत:च कमला नावाच्या महिलेची 'खरेदी' करून सिद्ध केली. अशा धैर्यशील पत्रकारांमुळे समाजव्यवस्था सुधारण्यास आणि सार्वजनिक जीवनाचे शुद्धीकरण होण्यास मदत झाली. पण केवळ सनसनाटी बातमीच्या हव्यासापोटी कुणी दुसऱ्याच्या खाजगी जीवनात शिरून नाहक बदनामी करण्याचे सत्र आरंभले, तर 'पत्रकार' म्हणून त्यांस संरक्षण मिळता कामा नये. समाजात पीत पत्रकारितेचे वादळ आज हि आहे आणि त्या माध्यमाचा समाजावर वाईट परिणाम होताना दिसत आहे मात्र याचा नाश होणे गरजेचे आहे . समाज हा होत असलेली पत्रकारिता ही पाहणे हेच समाजाचे काम आहे मात्र त्यातील जे काही गैरव्यवहार ते थांबवण्यास समाज हा नक्कीच मदत करू शकतो .मात्र यासाठी सर्व समाजाचे सहकार्य गरजेचे आहे .

Saturday, 20 October 2012

कॅमेरा -प्रभावी माध्यम










माध्यम क्रांती 

एखादी गोष्ट जेव्हा कथेतून सांगितली जाते तेव्हा त्यात आपल्या कल्पनेचा  चा विस्तार होत असतो आणि आपण ती गोष्ट विचारातून मांडत आसतो मात्र तीच गोष्ट जेव्हा माध्यमातून सांगितली जाते तेव्हा त्यात अनेक बाजू   असतात .आणि त्या मुळे ती कथा दाखवता त्यात विविध चित्र किवा लेखन दिलेले असते कि जेणेकरून ती कथा अधिक चांगल्या प्रकारे लोक्काना समजते याचे उदाहरण म्हणजे आपण एखादी बातमी वर्तमान पत्रात वाचतो त्याचे जेवढा परिमाण आपल्यार होतो त्या पेक्षा किती तरी जास्त परिणाम आपण तीच बातमी  दूरदर्शन वर पाहिल्यावर होतो आणि त्या मुळे त्याचा परिणाम  हा वर्तमान पत्राचा मानाने कितीतरी जास्त  आसतो 
          संमजा जर एखादी घटना दूरदर्शन चा पत्रकाराने अशीच सांगितली  तर त्याचा हवा तो परिणाम लोकांवर होणार नाही उलट दूरदर्शन चा विश्वासार्यातेवर प्रश्न चिन्ह उभे राहते कारण जर त्याने चित्र दाखवले नाही तर त्या बातमी ला पुरावा काय कि ती बातमी खरी आहे म्हणून मग त्या मुळे छायाचित्र हे दूरदर्शन मध्ये महत्व चा पुरावा ठरते माद्यामांचा समावेश येथेच महत्वाचा ठरतो कारण मध्यम हे समाजाला दिशादर्शक आस्ते आणि त्या मुळे त्याचा सबंध हा समाजाशी येतो ,समजा एकहात कथा अशीच सांगितली तर त्याचा कमी परिणाम होईल मात्र जर त्याला विविध चित्राची साथ मिळाली तर त्याचा परिणाम हा जास्त हिईल यात महत्व चे माध्यम म्हणजे कॅमेरा होय आणि त्याचा आज खूप मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो यामुळे छायाचित्र घेणे हि सोपे होते म्हणून त्याचा उपयोग हा पुरावा म्हणून हि केला जातो.
उदाहरणार्थ एखादी घटना घडली तर त्या ठिकाणचे छाचित्र काढले जाते तो एक पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो 
डेव्हिड बोर्डवेल यांचे मत आहे. कॅमेरा आपल्याला कथेबाबत असे काही सुगावे देतो जे मुख्य गोष्टीमधे खूप नंतर येतात हे बरोबर आहे कारण काही वेळा त्यात तथ्य आहे कॅमेरा हे आशी गोष्ट कॅपचर करतो कि ज्या मुळे अनेक सुराग मिळत जातात .

          हल्ली चा काळात ब्रेकिंग बातमी चा जमाना आला आहे आणि आजचे जीवन खूप धावपळीचे झाले त्या मुळे आशा वेळी एखादी गोष्ट लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचणे गरजेचे आस्ते.आशा वेळी हे कॅमेरा महत्व चे ठरतात कि ज्या मुळे पुरावा हि मिळतो आणि एखाद्या घटने ची दाहकता हि लक्षात येते.उदाहर्नाथ जर एखाद्या ठिकाणी दानागल झाली तर त्याची माहिती त्याची दाहकता आणि परिणाम  हि लोकांनी काही मिनिटांचा आत कळते

भाषा म्हणजे विचार








भाषा
भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन.  भाषांमधल्या शब्दप्रतीकांसंबंधात वेगवेगळ्या समाजांमधे बरीच सर्वसंमतता असते हे खरे, पण बऱ्याच वेळा समाजातल्या वेगवेगळ्या माणसांच्या मनात काहीकाही शब्दांचा वेगवेगळा "अर्थ" प्रतीक असतो. ही वस्तुस्थिती काही वेळा खूप अनर्थ निर्माण करू शकते, त्याचे कारण एकमेकांशी बोलणार्या दोन्ही माणसांना त्या वस्तुस्थितीची सुतराम कल्पना नसते. कुठल्याही भाषेतले शब्दभांडार जितके व्यापक तितकी ती भाषा नेमाने वापरणार्या माणसाची विचारक्षमता अधिक असण्याची शक्यता जास्त  वाढते शहरीकरण, इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव, बदलती जीवनशैली, समाजजीवन यामुळे आपल्या बोलीभाषेत कळत-नकळत बदल घडताहेत
      भाषेच्या वापराबाबतही काही नव्या समजुती रूढ होत आहेत. एसेमेस, चॅटिंगची स्वत:ची अशी एक वेगळी लघुभाषा तर निर्माण झालीच आहे. प्रत्येक व्यवसायाची वेगळी परिभाषा असते. तीही बदलतेय. शिवाय भाषेची काही वैशिष्टय़े शहरांपुरतीही असतात
विशिष्ठ नियमांना धरूनच भाषा नेहमी काम करत  असते म्हणून भाषेला भावनांची संस्कृतीची मर्यादा पडते आणि त्या नुसार ती बोलत असते. वाक्य आणि भाषा यांना जरी नियाम्मांचा कचाट्यात रहाव लागल तरी त्यांचे एक वेगळे विश्व हि आहे
भाषा आणि वाक्य हे घटनांचे प्रकटीकरण करत असते आणि समाजाचा  आरसा बनत असते त्या मुलेच ते त्यांचा विश्व पासून जोडलेले असते जनमाध्यमे  म्हणजे दूरदर्शन वर्तमानपत्र या सारक्या माध्यमांना भाषे ची गरज असते आणि त्यांचा मार्फत ते माहिती लोकांना पोहचवतात

लुड्विग विट्जेंस्टाइन यांच्या म्हणण्या नुसार ते बरोबर आहे कारण प्रत्येक भाषा स्वत ची एक नियमावली बनवते. 
जनमाध्यमे

           जनमाध्यमे  हि समाजाला  एक नवीन विचार करायला भाग पडते कि ज्या मुले भाषा हि आणखी प्रघाल्भा बनते प्रत्येक भाषेची स्वताची आशी नियमावली असते कि ज्या मुले ते त्यांचा एक कोश तयार करतात आणि त्या नुसार लोकांना माहिती पुरवतात मात्र प्रत्येक भाषेची वैशिट्ये  बलस्थाने  मर्यादा ह्या भाषे नुसार वेगवेगळ्या असतात  गेल्या २५-३० वर्षांत मराठी भाषेनं घेतलेलं वळण बघितल्यावर वाटू लागलंय की, आज आपण जे लिहितोय तेही काही काळाने दुर्गम्यच होणार आहे. आपल्या कळत-नकळत भाषा कूस बदलते आहे. ते थोपवणंही आपल्या हातात नाही. म्हणून भाषा हि नेहमी नियमामध्ये राहूनच मध्याम्माना  घेऊन बोलत असते.

शब्दगावी




शब्द  हे  संवादाचे एक महत्व चे आणि मुलभूत साधन आहे कि ज्या मुळे  संवाद   हा दुहेरी होतो आणि संवाद प्रक्रियेला चालना हि मिळते मात्र संवाद घडत आसताना त्या काही आशा घटकांचा हि समावेश आसतो कि ज्या मुळे संवाद अधिक प्रभावी होतो.यासठी  उत्तम माध्यमांची आणि साधनांची गरज पडते .
माझे शब्द काहीच नाही, त्यांचा रोख सर्वकाही. वॉल्ट व्हिट्मॅन  यांच्या या काव्यपंक्तींचे महत्त्व पत्रकारितेतील लिखाणाच्या संदर्भात  महत्त्वाचे आहे   कारण शब्द हो समaजतील अनेक गोष्टी चा उलगडा करत आसतो.केवळ एखादा रोख जर दुसर्यांबद्दल चा धाखावायाचा असेल तर त्या साठी हे शब्द महत्वाची भूमिका बजावतात कारण बर्याच वेळा एकद्यावर आस आरोप होऊ शकतो कि हे म्हणणे तुमचे आहे मात्र तो बहुतेक वेळा समाजाचा रोख असतो समाज मनाची भावना असते कि जी शब्दावाटे  इतर लोकां पर्यंत पोहोचते आणि त्यामुळे ती इतरांना हि कळते आणि म्हणून शब्द हे अनेक द समाज मनाला प्रतीबिब्बित करत असतात   याचे उदाहरण म्हणजे काही चांगले सामाजिक संस्था बर्याच वेळा काही मदत मागतात मात्र त्यांना ती दिली जात नाही कारण लोक्काना वाटते कि हिमाडत ते स्वत साठी वापरतील मात्र ते समाजासती मागतात पण ती त्यांची गरज नसते असेच शब्द हे एखाद्या घटनेचे माणसाचे त्यांचा भावनांचे प्रकटीकरण करतात कि ज्या मुळे शब्दा  मधूनच त्या विषयाचा त्या समस्येचा रोख कळतो आणि त्याचातला आशय हि कळतो . वॉल्ट व्हिट्मॅन   यांचे मत कि शब्द काहीच नाही त्यांचा रोख सर्व काही हे बरोबर आहे कारण शब्दा चा कल  हा  त्या घटनेतला रोख दाखवत असतो आणि त्या मुळेच शब्द हे  समाजाचे प्रतिनिधित्व करते आणि तांच्या विचारांना दिशा देते म्हणून पत्रकारिता क्षेत्रात शब्द हेच प्रमाण मानले जाते आणि त्यांचा वापर वरूनच त्यांचा आशय हि ठरवला जातो .पत्रकारांवर जर कधी त्याचा बोलण्या मुळे त्रास दिला गेला तर तो हेच सांगू शकतो कि हि घडलेली घटना आहे मी ती फक्त शब्द वापरून सांगितली आहे.शब्द आणि व्यक्तिमत्व यांचा काही संबंध नसतो कि ज्या मुळे हा एखादा अस बोलला तर तो तसाच असेल अस नाही कदाचित    त्या पेक्षा वेगळा असु शकतो. 


माध्यमाची विश्वासार्याहता आणि संस्कृतीचा वारसा


संस्कृती म्हणजे नेमके काय?
       एक पिढी जगण्याचे काही नियम ठरवून घेते, जेणे करून जीवन सोपे आणि सुलभ होइल. अशा काही गोष्टी अंगिकारते की ज्यामुळे समाजाचे एकमेकाबद्दलचे वर्तन, परस्परसंबंध सलोख्याचे राहतील. समाजाच्या हिताच्या दृष्टीने काही निर्णय घेते की जेणेकरुन सौहार्द नांदेल. एकमेकाबद्दलचे प्रेम वाढीला लागेल. समाजातील वाईट किंवा अनिष्ट गोष्टींना आळा घालता येइल. मग त्यानुसार सगळी पिढी जगायला लागते, जगते, वाढते. ही जी एकंदर प्रक्रिया असते त्यातुन तुमची आमची संस्कृती निर्माण होत असते. आपले पुर्वज जसे वागले तसे आज आपण वागतो आणि त्यालाच आपली संस्कृती म्हणतो. संस्कृती माणसाला शिकवते सुसंस्कृतपणा.पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे संस्कृती.
        गटेनबर्गच्या छपाई यंत्रापासून माणसाच्या संज्ञापन व्यवहारत यांत्रा चावापर सुरु झाला व त्यानंतरच संज्ञापन प्रक्रियेलावे वेग आला.
         संस्कृती हि काळानुसार बदलत जाते आणि त्या मुळेच ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधने हि बदलत जातात संस्कृती हि संवादाला एक नवीन दिशा देण्यास मदत करते आणि समाजामध्ये हि नवीन विचारांना रूजण्यास  हि मदत होते.वर्तमानपत्रे/दूरचित्रवाणी/रेडिओ/इंटरनेट  तयार करताना हि संकल्पना  महत्वाची ठरते कारण संस्कृती हि प्रत्येक माणसाला जोडलेली असते आणि ती संज्ञापानाचा एक अविभाज्य भाग आसते. 
माध्यमांचा  सहभाग 
            आज नवीन माद्यामांचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे त्यातून घरबसल्या अनेक घटना आपल्याला कळतात नवनवीन विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यातूनच नवनवीन संस्कृती हि लोकांपर्यंत पोहोचते आणि तेथूनच नवीन संस्कृती इतर ठिकाणी पण रुजू होते मात्र या साठी माद्यामांची भूमिका त्यांचे विषय मांडण्या ची हि पद्धत हि योग्य हवी कि ज्या मुळे संस्कृती आणि  साव्ज्ञापन यांचा  सुरेख संगम साधता येईल.जी पूर्वी पासून संस्कृती चालत आली आहे त्यंचे जतन व्हावे आणि ती संस्कृती पुढेही  चालावी या साठी आज अनेक माध्यमांनी पुढाकार घेतला आहे कि ज्या मुळे संस्कृती चा वारसा पुढे चालत राहील या साठी माद्यामे  पूरक भूमीका बजावताना  दिसतात त्या मुळे माद्यामांची सरशी झाली आहे म्हणून आज संवाद साधताना माध्यमे महत्वाची भूमिका बजावतात आणि त्या मुळे ती खूप  महत्व ची ठरतात 
आपली संस्कृती टिकायला हवी असेल तर हा नव्या-जुन्यांचा तोल आपल्याला सावरायलाच हवा.



माध्यमाची विश्वासार्याहता आणि संस्कृतीचा वारसा यांचा संबंधच संस्कृती आणि माध्यमे यांना  लोकांपर्यंत प्रभावी पाने पोहचवू शकते .