Saturday, 20 October 2012

कॅमेरा -प्रभावी माध्यम










माध्यम क्रांती 

एखादी गोष्ट जेव्हा कथेतून सांगितली जाते तेव्हा त्यात आपल्या कल्पनेचा  चा विस्तार होत असतो आणि आपण ती गोष्ट विचारातून मांडत आसतो मात्र तीच गोष्ट जेव्हा माध्यमातून सांगितली जाते तेव्हा त्यात अनेक बाजू   असतात .आणि त्या मुळे ती कथा दाखवता त्यात विविध चित्र किवा लेखन दिलेले असते कि जेणेकरून ती कथा अधिक चांगल्या प्रकारे लोक्काना समजते याचे उदाहरण म्हणजे आपण एखादी बातमी वर्तमान पत्रात वाचतो त्याचे जेवढा परिमाण आपल्यार होतो त्या पेक्षा किती तरी जास्त परिणाम आपण तीच बातमी  दूरदर्शन वर पाहिल्यावर होतो आणि त्या मुळे त्याचा परिणाम  हा वर्तमान पत्राचा मानाने कितीतरी जास्त  आसतो 
          संमजा जर एखादी घटना दूरदर्शन चा पत्रकाराने अशीच सांगितली  तर त्याचा हवा तो परिणाम लोकांवर होणार नाही उलट दूरदर्शन चा विश्वासार्यातेवर प्रश्न चिन्ह उभे राहते कारण जर त्याने चित्र दाखवले नाही तर त्या बातमी ला पुरावा काय कि ती बातमी खरी आहे म्हणून मग त्या मुळे छायाचित्र हे दूरदर्शन मध्ये महत्व चा पुरावा ठरते माद्यामांचा समावेश येथेच महत्वाचा ठरतो कारण मध्यम हे समाजाला दिशादर्शक आस्ते आणि त्या मुळे त्याचा सबंध हा समाजाशी येतो ,समजा एकहात कथा अशीच सांगितली तर त्याचा कमी परिणाम होईल मात्र जर त्याला विविध चित्राची साथ मिळाली तर त्याचा परिणाम हा जास्त हिईल यात महत्व चे माध्यम म्हणजे कॅमेरा होय आणि त्याचा आज खूप मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो यामुळे छायाचित्र घेणे हि सोपे होते म्हणून त्याचा उपयोग हा पुरावा म्हणून हि केला जातो.
उदाहरणार्थ एखादी घटना घडली तर त्या ठिकाणचे छाचित्र काढले जाते तो एक पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो 
डेव्हिड बोर्डवेल यांचे मत आहे. कॅमेरा आपल्याला कथेबाबत असे काही सुगावे देतो जे मुख्य गोष्टीमधे खूप नंतर येतात हे बरोबर आहे कारण काही वेळा त्यात तथ्य आहे कॅमेरा हे आशी गोष्ट कॅपचर करतो कि ज्या मुळे अनेक सुराग मिळत जातात .

          हल्ली चा काळात ब्रेकिंग बातमी चा जमाना आला आहे आणि आजचे जीवन खूप धावपळीचे झाले त्या मुळे आशा वेळी एखादी गोष्ट लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचणे गरजेचे आस्ते.आशा वेळी हे कॅमेरा महत्व चे ठरतात कि ज्या मुळे पुरावा हि मिळतो आणि एखाद्या घटने ची दाहकता हि लक्षात येते.उदाहर्नाथ जर एखाद्या ठिकाणी दानागल झाली तर त्याची माहिती त्याची दाहकता आणि परिणाम  हि लोकांनी काही मिनिटांचा आत कळते

भाषा म्हणजे विचार








भाषा
भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन.  भाषांमधल्या शब्दप्रतीकांसंबंधात वेगवेगळ्या समाजांमधे बरीच सर्वसंमतता असते हे खरे, पण बऱ्याच वेळा समाजातल्या वेगवेगळ्या माणसांच्या मनात काहीकाही शब्दांचा वेगवेगळा "अर्थ" प्रतीक असतो. ही वस्तुस्थिती काही वेळा खूप अनर्थ निर्माण करू शकते, त्याचे कारण एकमेकांशी बोलणार्या दोन्ही माणसांना त्या वस्तुस्थितीची सुतराम कल्पना नसते. कुठल्याही भाषेतले शब्दभांडार जितके व्यापक तितकी ती भाषा नेमाने वापरणार्या माणसाची विचारक्षमता अधिक असण्याची शक्यता जास्त  वाढते शहरीकरण, इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव, बदलती जीवनशैली, समाजजीवन यामुळे आपल्या बोलीभाषेत कळत-नकळत बदल घडताहेत
      भाषेच्या वापराबाबतही काही नव्या समजुती रूढ होत आहेत. एसेमेस, चॅटिंगची स्वत:ची अशी एक वेगळी लघुभाषा तर निर्माण झालीच आहे. प्रत्येक व्यवसायाची वेगळी परिभाषा असते. तीही बदलतेय. शिवाय भाषेची काही वैशिष्टय़े शहरांपुरतीही असतात
विशिष्ठ नियमांना धरूनच भाषा नेहमी काम करत  असते म्हणून भाषेला भावनांची संस्कृतीची मर्यादा पडते आणि त्या नुसार ती बोलत असते. वाक्य आणि भाषा यांना जरी नियाम्मांचा कचाट्यात रहाव लागल तरी त्यांचे एक वेगळे विश्व हि आहे
भाषा आणि वाक्य हे घटनांचे प्रकटीकरण करत असते आणि समाजाचा  आरसा बनत असते त्या मुलेच ते त्यांचा विश्व पासून जोडलेले असते जनमाध्यमे  म्हणजे दूरदर्शन वर्तमानपत्र या सारक्या माध्यमांना भाषे ची गरज असते आणि त्यांचा मार्फत ते माहिती लोकांना पोहचवतात

लुड्विग विट्जेंस्टाइन यांच्या म्हणण्या नुसार ते बरोबर आहे कारण प्रत्येक भाषा स्वत ची एक नियमावली बनवते. 
जनमाध्यमे

           जनमाध्यमे  हि समाजाला  एक नवीन विचार करायला भाग पडते कि ज्या मुले भाषा हि आणखी प्रघाल्भा बनते प्रत्येक भाषेची स्वताची आशी नियमावली असते कि ज्या मुले ते त्यांचा एक कोश तयार करतात आणि त्या नुसार लोकांना माहिती पुरवतात मात्र प्रत्येक भाषेची वैशिट्ये  बलस्थाने  मर्यादा ह्या भाषे नुसार वेगवेगळ्या असतात  गेल्या २५-३० वर्षांत मराठी भाषेनं घेतलेलं वळण बघितल्यावर वाटू लागलंय की, आज आपण जे लिहितोय तेही काही काळाने दुर्गम्यच होणार आहे. आपल्या कळत-नकळत भाषा कूस बदलते आहे. ते थोपवणंही आपल्या हातात नाही. म्हणून भाषा हि नेहमी नियमामध्ये राहूनच मध्याम्माना  घेऊन बोलत असते.

शब्दगावी




शब्द  हे  संवादाचे एक महत्व चे आणि मुलभूत साधन आहे कि ज्या मुळे  संवाद   हा दुहेरी होतो आणि संवाद प्रक्रियेला चालना हि मिळते मात्र संवाद घडत आसताना त्या काही आशा घटकांचा हि समावेश आसतो कि ज्या मुळे संवाद अधिक प्रभावी होतो.यासठी  उत्तम माध्यमांची आणि साधनांची गरज पडते .
माझे शब्द काहीच नाही, त्यांचा रोख सर्वकाही. वॉल्ट व्हिट्मॅन  यांच्या या काव्यपंक्तींचे महत्त्व पत्रकारितेतील लिखाणाच्या संदर्भात  महत्त्वाचे आहे   कारण शब्द हो समaजतील अनेक गोष्टी चा उलगडा करत आसतो.केवळ एखादा रोख जर दुसर्यांबद्दल चा धाखावायाचा असेल तर त्या साठी हे शब्द महत्वाची भूमिका बजावतात कारण बर्याच वेळा एकद्यावर आस आरोप होऊ शकतो कि हे म्हणणे तुमचे आहे मात्र तो बहुतेक वेळा समाजाचा रोख असतो समाज मनाची भावना असते कि जी शब्दावाटे  इतर लोकां पर्यंत पोहोचते आणि त्यामुळे ती इतरांना हि कळते आणि म्हणून शब्द हे अनेक द समाज मनाला प्रतीबिब्बित करत असतात   याचे उदाहरण म्हणजे काही चांगले सामाजिक संस्था बर्याच वेळा काही मदत मागतात मात्र त्यांना ती दिली जात नाही कारण लोक्काना वाटते कि हिमाडत ते स्वत साठी वापरतील मात्र ते समाजासती मागतात पण ती त्यांची गरज नसते असेच शब्द हे एखाद्या घटनेचे माणसाचे त्यांचा भावनांचे प्रकटीकरण करतात कि ज्या मुळे शब्दा  मधूनच त्या विषयाचा त्या समस्येचा रोख कळतो आणि त्याचातला आशय हि कळतो . वॉल्ट व्हिट्मॅन   यांचे मत कि शब्द काहीच नाही त्यांचा रोख सर्व काही हे बरोबर आहे कारण शब्दा चा कल  हा  त्या घटनेतला रोख दाखवत असतो आणि त्या मुळेच शब्द हे  समाजाचे प्रतिनिधित्व करते आणि तांच्या विचारांना दिशा देते म्हणून पत्रकारिता क्षेत्रात शब्द हेच प्रमाण मानले जाते आणि त्यांचा वापर वरूनच त्यांचा आशय हि ठरवला जातो .पत्रकारांवर जर कधी त्याचा बोलण्या मुळे त्रास दिला गेला तर तो हेच सांगू शकतो कि हि घडलेली घटना आहे मी ती फक्त शब्द वापरून सांगितली आहे.शब्द आणि व्यक्तिमत्व यांचा काही संबंध नसतो कि ज्या मुळे हा एखादा अस बोलला तर तो तसाच असेल अस नाही कदाचित    त्या पेक्षा वेगळा असु शकतो. 


माध्यमाची विश्वासार्याहता आणि संस्कृतीचा वारसा


संस्कृती म्हणजे नेमके काय?
       एक पिढी जगण्याचे काही नियम ठरवून घेते, जेणे करून जीवन सोपे आणि सुलभ होइल. अशा काही गोष्टी अंगिकारते की ज्यामुळे समाजाचे एकमेकाबद्दलचे वर्तन, परस्परसंबंध सलोख्याचे राहतील. समाजाच्या हिताच्या दृष्टीने काही निर्णय घेते की जेणेकरुन सौहार्द नांदेल. एकमेकाबद्दलचे प्रेम वाढीला लागेल. समाजातील वाईट किंवा अनिष्ट गोष्टींना आळा घालता येइल. मग त्यानुसार सगळी पिढी जगायला लागते, जगते, वाढते. ही जी एकंदर प्रक्रिया असते त्यातुन तुमची आमची संस्कृती निर्माण होत असते. आपले पुर्वज जसे वागले तसे आज आपण वागतो आणि त्यालाच आपली संस्कृती म्हणतो. संस्कृती माणसाला शिकवते सुसंस्कृतपणा.पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे संस्कृती.
        गटेनबर्गच्या छपाई यंत्रापासून माणसाच्या संज्ञापन व्यवहारत यांत्रा चावापर सुरु झाला व त्यानंतरच संज्ञापन प्रक्रियेलावे वेग आला.
         संस्कृती हि काळानुसार बदलत जाते आणि त्या मुळेच ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधने हि बदलत जातात संस्कृती हि संवादाला एक नवीन दिशा देण्यास मदत करते आणि समाजामध्ये हि नवीन विचारांना रूजण्यास  हि मदत होते.वर्तमानपत्रे/दूरचित्रवाणी/रेडिओ/इंटरनेट  तयार करताना हि संकल्पना  महत्वाची ठरते कारण संस्कृती हि प्रत्येक माणसाला जोडलेली असते आणि ती संज्ञापानाचा एक अविभाज्य भाग आसते. 
माध्यमांचा  सहभाग 
            आज नवीन माद्यामांचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे त्यातून घरबसल्या अनेक घटना आपल्याला कळतात नवनवीन विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यातूनच नवनवीन संस्कृती हि लोकांपर्यंत पोहोचते आणि तेथूनच नवीन संस्कृती इतर ठिकाणी पण रुजू होते मात्र या साठी माद्यामांची भूमिका त्यांचे विषय मांडण्या ची हि पद्धत हि योग्य हवी कि ज्या मुळे संस्कृती आणि  साव्ज्ञापन यांचा  सुरेख संगम साधता येईल.जी पूर्वी पासून संस्कृती चालत आली आहे त्यंचे जतन व्हावे आणि ती संस्कृती पुढेही  चालावी या साठी आज अनेक माध्यमांनी पुढाकार घेतला आहे कि ज्या मुळे संस्कृती चा वारसा पुढे चालत राहील या साठी माद्यामे  पूरक भूमीका बजावताना  दिसतात त्या मुळे माद्यामांची सरशी झाली आहे म्हणून आज संवाद साधताना माध्यमे महत्वाची भूमिका बजावतात आणि त्या मुळे ती खूप  महत्व ची ठरतात 
आपली संस्कृती टिकायला हवी असेल तर हा नव्या-जुन्यांचा तोल आपल्याला सावरायलाच हवा.



माध्यमाची विश्वासार्याहता आणि संस्कृतीचा वारसा यांचा संबंधच संस्कृती आणि माध्यमे यांना  लोकांपर्यंत प्रभावी पाने पोहचवू शकते .


Friday, 19 October 2012

भाषांतर किंवा अनुवाद.





एका भाषेतला मजकूर नेमकेपणाने दुसऱ्या भाषेत व्यक्त करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे भाषांतर किंवा अनुवाद.

एखाद्या साहित्यकृतीचा अनुवाद करण्यासाठी नेमकं काय काय लागतं असा विचार केला तेव्हा नजरेसमोर या तीन गोष्टी येतात 
 १. माहिती (सांस्कृतिक संदर्भ इ.)
 २. साधने (कोश इ.)
 ३. कौशल्ये (अनावश्यक अर्थ अनुवादात आणणे कसे टाळायचे इ.)
अनुवाद करण्यासाठी लागणारी किमान माहिती/ज्ञान-
 १. स्रोतभाषेच्या (ज्या भाषेतून अनुवाद करायचा ती भाषा) केवळ आकलनापुरते ज्ञान: म्हणजेच, इंग्रजीतील एखाद्या कथेचा अनुवाद करायचा असेल, तर इंग्रजीतील शब्द, त्यांचे अर्थ, ते शब्द एखाद्या प्रकारे मांडल्यावर कोणता अर्थ समोर येतो इ. इ. गोष्टींचे ज्ञान  हवे .
 २. लक्ष्यभाषेत (ज्या भाषेत अनुवाद करायचा ती भाषा) निर्मिती करण्यासाठी आवश्यक ज्ञान: म्हणजेच, जर मराठी भाषेत अनुवाद करायचा असेल, तर विशिष्ट अर्थ दर्शवणारे मराठीतले शब्द, आपल्याला हवा तो अर्थ अभिव्यक्त करण्यासाठी शब्दांची कशी मांडणी करावी लागेल इ. इ. गोष्टीचे ज्ञान  हवे .

थोडक्यात काय, तर स्रोतभाषा समजणे महत्त्वाचे, वापरता येणे नव्हे. याउलट, लक्ष्यभाषा वापरता येणे मात्र फारच महत्त्वाचे. एवढे आले, म्हणजे अनुवाद करता येतो

अनुवाद करताना अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते आणि त्या मूळेच अनुवादाची प्रक्रिया काहीशी कठीण असते.मात्र अनुवादात स्त्रोत लक्ष्य भाषा त्यांची वैशिस्ठे बलस्थाने आणि मर्यादा तसेच त्यांचा तील परस्पर संबंध हि यात महत्वाचा असतो.

अनुवाद करताना खालील गोष्टी काही प्रमाणात लोप पावतात -
१. आशय बदलतो
२. विषयाचा रोख बदलतो
३. लोकांना जो संदेश पाहोचावायाचा आहे तो कधी कधी वेगळाच पोहोचतो
४.साहित्य कृतीतील ज्या संसृतीचा प्रभाव आहे त्याचा नकारात्मक प्रभाव हि पडू शकतो अ
५.अनुवाद करताना कधी कधी चुकीचा अनुवाद झाला तर संपूर्ण लेखाचा अर्थ हि बदलू शकतो
म्हणून अनुवाद करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात -
१.अनुवाद करताना आशय घनता लक्षात घ्यावी 
२.लेखाचा हेतू लक्षात घ्यावा
३.अनुवाद करणाऱ्या वैक्तीला अनुवाद चे उत्तम ज्ञान असावे.
४.लेखाची  सामाजिक पर्शभूमी  लक्षात  घावी .
कोणत्या हि लेखाचा निबंधाचा  किवा बातमी चा अनुवाद करताना विविध  सांस्कृति चे भान असणे आवशक आहे  सांस्कृतिमधील सण चालीरीती याची माहिती असावी

चित्रांची भाषा ही सर्वदूर समजली जाणारी भाषा


चित्र ची भाषा आशी भाषा कि ज्यात काही बोलण्या ची गरज पडत नाही म्हणून आज चित्रातून  अनेक बाबतीत ला उलगडा केला जातो .



   जन संवादाबाबतच्या सर्व आविष्कारांमधे चित्रांची भाषा ही सर्वदूर समजली जाणारी भाषा आहे.
हे  वॉल्ट डिस्ने यांचे वाक्य आहे.
जनसंवाद हा आज केवळ बोलण्यातून व्यक्त होत नाही तर चित्रांचा माध्यामातून हि तो केला जातो .एखादी घटना जर जास्तीत जास्त लोक्काना जर नीट समजावून सांगायचे असेल तर चित्र हे योग्य माध्यम आहे.मध्यम विश्वात घडण्यर्या ज्या घटना असतात त्यांचा संबंध  हा समाजाशी  असतो त्या मुलेच मग हा परिणाम लोकांपर्यंत पोहोचवण्या साठी आसे विविध पर्याय योजावे लागतात.  
      चित्राची भाषा कळायला कठीण नाही, तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलात ना तर ते खूप सोपं आहे. त्याकरता सारखी चित्रं बघायला हवीत, चित्रकारांशी बोलायला पाहीजे. चित्रातली प्रतिकात्मकता वगैरेही जाणून घ्यायची फ़ार गरज नसते,  नवी व्हिज्युअल भाषा अस्तित्वात येऊ घातली आहे. ती परस्परसंवाद कसा व कोणत्या माध्यमातून सादर करणार याचा कोणालाच अंदाज करता येत नाही एवढा गुंता वाढला आहे. चित्रपटाची भाषा, चित्रांची भाषा येऊ घातल्यामुळे शब्दाक्षरांची भाषा तेवढी प्रभावी राहिलेली नाही. परिणामत: शब्दाक्षरांची भाषा आपला डौल गमावून बसली आहे. शब्दाक्षरांच्या भाषेचा वापर सध्या फक्त कार्योपयोगी होत आहे. वाङ्मयनिर्मितीतील अभिजातता लोपते की काय, अशी शंका आधीच येऊ लागली आहे. चित्राचा आशय काय आहे, ते कशाचे चित्र आहे, ते ज्या  प्रकारच्या वस्तूचे किंवा प्रसंगाचे आहे, त्याचे जीवनात किती महत्व आहे, त्या वस्तूच्या किंवा प्रसंगाच्या, त्या चित्राने घडविलेल्या दर्शनामुळे प्रेक्षकांच्या मनात कोणत्या करूणा, शोक, आनंद इ. भावना जागृत होतात ह्या गोष्टीवर चित्राचे सौंदर्य यत्किंचितही अवलंबून नसते, तर चित्राचे चित्र म्हणून जे रंग, रेषा, पृष्ठभाग इ. भाग असतात. त्यांच्या परस्परसंबंधांमधून सिद्ध होणाऱ्या त्याच्या आकारावर त्याचे सौंदर्य अवलंबून असते..

               म्हणूनच चित्राची भाषा हि अधिक सोयीची ठरते आणि समजण्यास हि सोपी आहे हि भाषा साक्षर ते निरक्षर  लीकांना हि अधिक सहज पणे कळते आणि चित्रे हि शब्दांपेक्षा  अधिक बोलकी आसतात  यावरून ती अधिक परिणाम कारक ठरतात.  


"फाशी" प्रकरण







       सनस्टाईन  व वेरम्यूल या 'हार्वर्ड लॉ स्कूल' मधल्या प्राध्यापकांनी 'Is capital punishment morally required?' या नावाचा एक लेख २००५ साली प्रसिद्ध केला.
      मृत्युदंड विरोध निव्वळ हास्यास्पद आहे, शिक्षा हि यासाठी नसते कि जे वाईट कृत्य केले त्याची शिक्षा तर त्याचा दुसरा पैलू हा सुद्धा असतो कि इतर माणसाना दहशत बसावी कि हे कृत्य केले तर आपला सुद्धा मृत्यू निश्चित आहे.जर कोणाला भीतीच उरणार नाही तर प्रत्येक जण खून करत सुटणार आणि आपण काय त्यांना सुधारत बसायचे आणि वाट पहायची कि हा कधीतरी नक्की सुधारेल. कायदेशीर मारण्याच्या पद्धती फासाला लटकावणं, विजेचा शॉक, विषारी इंजेक्शन,फायरिंग स्क्वाड, डोकं उडवणं, गॅस चेंबर. या आहेत.
 
1.      फाशी दिल्याने प्रश्न सुटतात असे वाटते का ?

2.      प्रत्येक माणसाला सुधारण्याची संधी नको का?

3.      त्याने केलेले कृत्य हे कोणत्या परिस्थितीमध्ये केले आहे हे पाहायला नको का?
.          या सर्व गोष्टी पाहुनच फाशीची शिक्षा सुनावली जाते.हा निसर्ग नियमच आहे (एकाच्या मृत्यूची शिक्षा शी मृत्युचं असू शकते).
         अफगाणिस्तान,बांगलादेश, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, भारत, इराण, इराक, जपान, कुवेत, उत्तर कोरिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सिंगापूर, अमेरिका, विएतनाम, येमेन हे सर्व देश मृत्युदंड देतात.-ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान या सर्व देशांनी मृत्युदंडाची शिक्षा कायद्यातून काढून टाकली आहे.
Ø  सर्व प्रकारच्या गुन्ह्यांसाठी फाशी रद्द केली आहे असे एकूण देश : ब्याण्णव.
Ø  फक्त स्पेशल गुन्ह्यांसाठी फाशी राखून ठेवली आहे असे देश: दहा..
Ø  फाशी देण्याची तरतूद आहे पण गेल्या दहा वर्षात वापरली नाही असे देश: बत्तीस
Ø  फाशी चालू आहे आणि रेग्युलर देतातही असे देश: चौसष्ठ.


फाशी विरोधकांचे मुद्दे:



v  क्रूर आणि अमानवी..कायदेशीर खून. म्हणून तो नकोच.
v  चुकीचा निर्णय होण्याची शक्यता.
v  जगण्याचा मूलभूत अधिकार गुन्हेगारालाही आहेच. मग फाशी कशाला?
v  जन्मठेपही पुरेशी वचक बसवणारी असते मग फाशी कशाला.. ?
v  फाशीने गुन्ह्यांची संख्या कमी होत नाहीये. म्हणून ती इफेक्टीव्ह नाहीये.

-फाशीच्या बाजूनं असणा-यांचे मुद्दे:

v  सेन्स ऑफ जस्टीस. न्यायाचं समाधान. खून के बदले खून. आय फॉर आय. जिवासाठी जीव..
v  जन्मठेपेपेक्षा कमी खर्चिक.
v  गुन्हेगाराला जिवंत ठेवलं तर नंतर सुटण्याची, पळून जाण्याची संधी राहते. फाशीने ही संधी मिळत नाही.
v  जन्मठेप ही जास्त त्रासदायक आहे. त्यापेक्षा फाशीने सुटका मिळते.


माझे मत थोडक्यात सांगायचे तर फाशीची तरतुद असावी.. मात्र ती फारशी वापरली जाऊ नये. हे "फाशी" प्रकरणच धोकादायक आहे.. फाशी म्हणजे नक्की किती तर माझ्या मते वैयक्तीक गुन्हांसाठी ही शिक्षा नसावी. जसे एका व्यक्तीने एका व्यक्तीवर केलेला बलात्कार, एका व्यक्तीने एका व्यक्तीचा काही कारणाने केलेला खून वगैरे वगैरे. सामुहिक, राष्ट्रद्रोही, देशावर हल्ला वगैरे गुन्हात या शिक्षेची तरतुद तर असावीच प्रसंगी शिक्षाही व्हावी

देशाला कलंक







           आसाममधील जातीय हिंसाचार हा देशाला कलंक असून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. वृत्तवाहिन्यांवर २00२ च्या गुजरात दंगलीचा विषय निघाला की, त्याला जोडून १९८४ च्या शीखविरोधी दंगलीचा मुद्दा पुढे सरकवला जातोच. तसे झाले नाही तर गुजरात दंगलीची चर्चा करणार्‍यावरच पूर्वग्रह दूषित असल्याचा आरोप केला जातो. हे आरोप-प्रत्यारोप होताना एक बाजू दुसर्‍या बाजूला जणू सुनावतच असते की, ‘‘बघा, आमच्या कार्यकाळात झालेल्या दंगलीत तुमच्या काळात झालेल्या दंगलीपेक्षा कमी माणसे मेली, म्हणजे दंगली हाताळण्याचे आमचे रेकॉर्ड तुमच्यापेक्षा चांगले आहे, तुम्ही काय आम्हाला दंगलीविषयी सांगता.!’’
दंगलीसारख्या भयावह आणि निंदाजनक हिंसाचाराचे हिशेब असे कायम तुलनात्मकदृष्ट्याच मांडले जातात.प्रत्यक्षात कुठल्याही दंगलीत बळी गेलेला सामान्य जीव म्हणजे देशाच्या प्रतिमेला लागलेला कलंकच; पण टेलिव्हिजन स्टुडिओतल्या कर्कश आरडाओरड्यात हे सत्यच दडपले जाते.
सध्या गुजरात आणि आसामच्या दंगलीचे असेच तुलनात्मक गणित मांडले जाते आहे. ‘‘ज्या हिरिरीने चोवीस तास रिपोर्टिंग करून मीडियाने गुजरात दंगल कव्हर केली, त्याचपद्धतीने आसामची दंगल का कव्हर करण्यात आली नाही, का दिसला नाही आसाममधला हिंसाचार टीव्हीवर लाइव्ह.?’’ असाअनेक व्यासपीठांवर उपस्थित केला जातो आहे. माध्यमांनी आसाम दंगल चोवीस तास थेट रिपोर्टिंग करत, वास्तव दाखवत कव्हर केली नाही कारण आसामात बोडोत्या दंगलीत भरडले जात होते; पण हीच माध्यमे गुजरात दंगल दाखवण्यात आघाडीवर होती, कारण गुजरात दंगलीत मुस्लीम मारले जात होते.
पण या युक्तिवादापेक्षा सत्यवेगळेच आहे आणि ते अधिक कोरडे वास्तव आहे. दंगलीने पेटलेली कोक्राझार ही आसामची राजधानी गुवाहाटीपासून किमान १५0 किलोमीटर दूर आहे. कोक्राझार तर जाऊच द्या; पण गुवाहाटीतही कुठल्याच नॅशनल चॅनलची ओबी व्हॅन नाही. ती नाही त्यामुळे लाइव्ह कनेक्टिव्हीटी नाही. आसामातल्या हिंसाचाराची माहिती कळून प्रत्येक चॅनलचे रिपोर्टर दंगलग्रस्त भागात पोहचेपोहचेपर्यंत बर्‍याच ठिकाणची दंगल आटोक्यात आलेली होती. ही दंगल एकतर्फी मुळीच नव्हती. बोडो, बंगाली हिंदू, आदिवासी आणि मुस्लीम असे सगळेच या दंगलीत भरडले गेले. या भागात राहणार्‍या विविध धर्मीय समाजातल्या सगळ्यांसाठीच ही दंगल जीवघेणी ठरली. तरीही अधिकृत आकडेवारी पाहिली तर आज निर्वासितांच्या छावण्यात इतर कुठल्याही धर्माच्या लोकांपेक्षा दंगलीत होरपळलेल्या मुस्लीम लोकांची संख्या अधिक आहे. मात्र, आज माध्यमातला कल्लोळ पाहिला तर असे चित्र रंगवले जाते आहे की, या दंगलीत एकाच समुदायाच्या माणसांचा बळी गेला. प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. बोडोंना आपली जमीन गमवावी लागली हे जसे खरे आहे तशीच मुस्लिमांनाही त्यांची जमीन गमवावी लागली आहे; पण कुणातरी एकावरच ठपका ठेवण्याचा लोकप्रिय काल्पनिक कार्यक्रम या दंगलीतही राबवला जात आहे.