पत्रकारिता करणे म्हणजे समाजातील सर्व स्तरांवर सत्तेचा वापर तपासून पाहणे. त्याची शहानिशा करणे. त्यामुळे पत्रकारिता करणारी व्यक्ती ही नेहमीच कोणाला ना कोणाला तरी अडचणीची असणे अपरिहार्य आहे.आणि त्यामुळे पत्रकारितेला कायद्याचे कवच असणे गरजेचे आहे मात्र पत्रकारांनी पण समाजाची सेवा करणे ही आणि ती पण आपले कर्तव्य समजून करणे गरजेचे आहे.

मात्र तरीही आज प्रसारमाध्यमे ही आपली जबाबदारी सोडून वागताना दिसत आहेत. पत्रकार हा लोकशाहीचा एक प्रभावी स्तंभ असला तरी त्याचे झपाटयाने होत गेलेले अवमूल्यन समाजापासून लपून राहिलेले नाही. पेड पत्रकारिता, सुपारी पत्रकारिता यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तर त्यातले पक्षपाती आणि सहेतुक वार्तांकन सोशली जागरूक व्यक्तीला समजणे कठीण नसते. विशेषतः इलेक्ट्रोनिक मेडियाच्या सवंग बातम्यांचा भडीमार अशा कायदेशीर संरक्षणातून कोणत्या थराला जाईल याची केवळ कल्पनाच करावी. मात्र असे असताना कायदा ही पत्रकारितेला तितकाच धुत्कारतो आहे.एकीकडे कायदा आणि प्रसारमाध्यमे ही परस्पर पुरक दाखवली जातात आणि दुसरीकडे कोर्टावर लिहायचं नाही, त्यातला भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणायचा नाही, विधानसभा, कोर्ट रुम्स, खुलेपणाने ‘लाइव्ह’ दाखवायच्या नाहीत, स्टिंग ऑपरेशन्स करायची नाहीत, ऑडिओ रेकॉर्डिग हे कायद्याच्या लेखी. ठोस पुरावा म्हणून ग्राह्य नाही. अस बोललं जात मग पत्रकारितेचं होणार काय?असा प्रश्न ही निर्माण होतो आणि पत्रकार हा बेडीत अडकल्या सारखा भासतो. पत्रकारिता ही निर्भयपणेच होणे जास्त गरजेचे आहे तरच समाजात शांतता आणि सुव्यवस्था येऊ शकेल मात्र त्यासाठी कायद्याची बंधने दुर होणे गरजेचे आहे. असे असताना ही पत्रकारांना कायदा म्हणजे काय तो कसा वापरावा त्याचे फायदे काय हे पण माहीत असणे गरजेचे आहे.माध्यमांमध्ये काम करणार्या पत्रकारांना कायद्याची जाण असली पाहिजे तसेच पत्रकारिता करताना त्याचे भान देखील असले पाहिजे, अन्यथा कायदेशीर बाबींना सामोरे जाण्याची वेळ येवू शकते, हक्कांची भाषा करतांना त्याच वेळी कर्तव्याची देखील जाणीव ठेवणे आवश्यक आहे. दुसर्याचा हक्क म्हणजे माझे कर्तव्य आहे याच भान असावे. प्रामाणिक हेतू ठेवून कायद्याचे बंधन पाळण्याची पत्रकाराने काळजी घ्यावी म्हणजे कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागणार नाही,प्रत्येक पत्रकाराला कायद्याची मुलभूत माहिती असणे आवश्यक आहे. तरच त्याची पत्रकारिता यशस्वी होवू शकेल. स्वतंत्र भारतातली पत्रकारिता ही रंगाने-ढंगाने पूर्णपणे बदलली. पत्रकारितेचा ‘धर्म’ ही संज्ञा बदलून पत्रकारिता ‘व्यावसायिक झाली. मात्र हे होत असताना पत्रकार हे कायद्याचा धाक सोयीस्कर पणे विसरले आणि आपण म्हणजेच सर्वकाही ही वृत्ती त्यांच्यात शिरली मात्र कायदा हा प्रत्येकासाठी सारखाच असतो आणि त्याची नीट अंमलबजावणी होणे गरजेचे आहे असे करण्यासाठी समाजातील प्रतिनिधींनी पुढे येणे गरजेचे आहे आणि प्रसारमाध्यमे ही भुमिका समर्थपणे पेलु शकतात.आज कायदा म्हटला की प्रत्येक सामान्य माणुस यापासुन चार हात दुर पाळतो खर तर कायदा हा त्यांच्याच रक्षणासाठी असतो मात्र त्यांना याचे भय वाटते हीच कायद्याबद्दल ची भीती काढुन टाकुन त्या विषयी आस्था निर्माण करण्याचे काम हे पत्रकारितेने करणे गरजेचे आहे तरच भारतीय जनता शांत आणि सम्रुद्ध जीवन जगु शकेल यात शंका नाही.
No comments:
Post a Comment